Friday, February 19, 2021

शिवाजी महाराज ऐकताय ना!

 


                 शिवाजी महाराज ऐकताय ना!

      ऐसे आज स्वार्थी मोठे नेते आपले नावाचा वापर आणि खोटे इतिहासचा वापर करुण मुस्लिमद्वेष फैलावून झाले.पक्ष स्थापन केले. तिथि आणि तारखेचे वाद करुण दोन गट केले.आज सत्तेसाठी एकत्र येवूनही आजही राज्यभर एक शिवजयंती एका ताराखेला साजरी करू शकत नाही. तू तुझी तारखेची साजरी कर, मी माझ्या तिथिची साजरी करणाऱ्याच्या पुरख्याना महाराज आपली समाधी ही माहित नव्हती. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपली समाधी शोधून काढ़ली.साफ सफाई करुण फुले समाधी वर वाहिली होती.अश्या वेळी कोणी आपल्या समाधी वर फुले लाथेने हटवून त्रागा करणारे हिंदू म्हणविनारे भट होते.म्हणून आजही कोणीच भटाना त्रास देत नाही.कृष्णा भास्कर कुलकर्णी याने आपल्या माथ्यावर केलेल्या तलवारीचे वार बाबत कधीच सर्व भटाना जबाबदार धरत नाही.ज्यांनी आपल्या राज्यभिषेकास विरोध केला होता आणि आपल्याला राजा मानन्यास तय्यार ही नव्हते.आजही अनेक आपली बदनामी आपली प्रतिमा मलिन करण्याचे सातत्याने प्रयत्न आज दिवसाखेर सुरुच आहे.
      अश्याच एका फेसबुक वरील आपले अवमान करन्यार्या पोस्टने मोहसिन शेख तरुण इंजीनियर जेंव्हा नाव विचारुन का कट्टर हिंदुत्ववादी हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्या कडून होते.एका आईबापाचा आधार हिरावला जातो तेंव्हा मला आपल्याला काही प्रश्न विचारावेसे वाटते. 
     खर सांगा आपण रायगड वर आपल्या महला समोरच मस्जिद का बांधली होती?
      रुस्तमेजमा जातीने मुसलमान असतांना  आपला गुप्तहेर हेच समजल नाही.
      नुरखांन बेग सव्वा लाख फौजेचा सरसेनापति का म्हणून महाराज आपण नेमला होता ?
हा इब्राहिम गार्दी तोफाखान्याची जबाबदारी मुसलमान असताना कसा काय स्वीकारतो ?आपण मुसलमानाला एवढी मोठी जबाबदारी दिलीच कशी ?
       दौलतखानला आरमारची जबाबदारी मी समजू शकतो,कारण समुद्र गमन हिंदू धर्मात पाप आता आहे की नाही माहित नाही परंतु आपल्या काळात होती.स्वातंत्र पूर्व काळात गोलमेज परिषद नंतर इंग्लैंड वरुण  बालगंगाधर टिळक यांना समुद्र गमन केल्याची हिंदू धर्मशास्त्र नुसार शिक्षा देण्यात आली होती.या कारणाने मुसलमानच आपल्या आरमार दलात असणार हे सांगण्यास त्या वेळी कोणा ज्योतिषाची गरज नव्हती ! कबूल आहे, तरीपण आपण आरमार उभारले.
      आपला वकिल हैदर काजी, बाबा याकूत आपले गुरु,मदारी मेहत्तर आपला अंगरक्षक, घोडदल प्रमुख सीढ़ी वहाब,महाराज सगळे विस्वास पात्र महत्वाची जबाबदारी आपण मुसलमान असणाऱ्या व्यक्तिवर दिली कशी ?
महाराज ऐकताय ना ! कारण तुम्हाला ठाऊक होते.जे भी काम मुसलमान करतो बड़े इमाने ऐतबाराने करतो.अंध श्रद्धालू नसल्याने बड्या बहादुरी ने दुश्मनी सैन्याचे पराभव करतो.
     महाराज आपल्याला राजा म्हणून कोणी संबोधले,वाघ नख़्या कोणी दिल्या, आपले तैल चित्र कोणी काढले,इतिहास कोणी काय काय उपाधी दिल्या हे सांगत बसणार नाही.
     खंत महाराज,अफजलखानच्या कोठल्या पासून ते शाहस्ते खानच्या बोटा पर्यंत आपल्या इतिहासात बंदिस्त करुण,आज आपल्या नावाने आज हिन्दू मुसलमान द्वेष जेंव्हा हिंदुचे रक्षक म्हणून पसरविला का जातो हेच कळत नाही .
      महाराज हा जो भारत देश आहे है एकसंघ जो आजही आहे यात अनेक पीर संताचा ,अनेक बलिदान देणाऱ्यां स्वातंत्रविराचा मोठा वाटा आहे.आपण देश घडवला.या देशसगळ्याना सगळे कळतय,पण स्वार्थाच्या प्रेमापोटी वळत नाही. मनात बरच प्रश्न सतावत होते म्हणून आज चला ताराखेच्या का होईना शिवाजी महाराज्यांच्या शिवजयंतीला मन मोळले सोशल मीडिया आपल्याशी संवाद साधला.भविष्यात हिन्दू मुस्लिम सलोख्याचे संबध आणखी मजबूत होतील हे निश्चितच..हे मात्र खरे. 

अफजल सय्यद, अहमदनगर,
पक्का टक्का महाराष्ट्रीयन मुसलमान

No comments:

Post a Comment