Wednesday, April 22, 2020

तिचा हा "thank you" आम्हां कार्यकर्त्यांना ही बारा हत्तीचं बळ देऊन गेलं....


                                        न्यूज व्हलुज


तिचा हा "thank you" आम्हां कार्यकर्त्यांना ही बारा हत्तीचं बळ देऊन गेलं....

मदत लहान, कृतज्ञता महान!

            अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती असलेली एक मोठी झोपडपट्टी म्हणजे "लालटाकी"...खरं तर हे नाव नगरकरांसाठी नवे नाही.... कारण ही वस्ती अनेक कारणांमुळे नेहमीच प्रसिद्ध असते. अनेक मागासवर्गीय जाती धर्माचे दहा हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वस्ती. येथे दररोज पोलीस व गुंडांची ये जा चालू असते, पूर्वी दारू पिऊन भांडण, मारामारी, शिव्या-गाळ, सर्व दोन नंबरचे बेकायदेशीर धंदेचा मोठा अड्डा, एक गुन्हेगारांची वस्ती म्हणजे लालटाकी झोपडपट्टी अशी ओळ्ख आता पुसून बालभवनाने हुशार, अभ्यासू व खेळाडूंची सेवावस्ती अशी घडवली आहे....
या वस्तीत गोंधळी समाजाची 40 कुटुंब अतिक्रमण करून मागील तीन पिढ्यांपासून राहतात, त्यातील आमचे उत्कर्ष बालभवनची लाभार्थी प्रतिक्षा वाकोडेचे कुटुंब, प्रतिक्षाचे वय जेमतेम 9 वर्ष, इयत्ता चौथीमध्ये पंचशील शाळेत शिकते, वडील 4 वर्षांपूर्वी हार्टफेल झाल्यामुळे देवाघरी गेले, माघे विधवा आई रेणुका वय 27 वर्ष, दोन छोटी बहीण कोमल 6 वर्षाची तर  राधा 4 वर्षाची.... वडील गेले तेव्हा आईच्या पोटात होती राधा....घरामध्ये वडिलांची अंध आई वय असेल 65 च्या जवळपास हे सर्व पाच लोकांचे कुटुंब, एका दहा बाय पंधराच्या जागेत लाकडी फळ्या, अर्धी कच्चीभिंत, जुन्या गळके पत्र्यावर फाटके प्लास्टिक कव्हरने बांधलेले, साड्यांची आतून सजावट केलेल्या घरात राहतात.... या समाजाचा मुख्य व्यवसाय म्हणजे दारोदारी जावून भांडे विकून कपडे गोळा करायचे आणि या कपड्यांचे मोठं-मोठे गाठूडे बांधायचे व मुंबईला जाऊन विकून यायचे, यातून जे पैसे येतील त्यावर कुटूंबाला खायला घालायचे, प्रतिक्षाच्या आईने पण नवरा गेल्यानंतर हाच व्यवसाय स्वीकारला, मयतीच्या पाचव्याच दिवशी,  सोबत राधाला कड्यावर घेऊन ती कपडे गोळा करण्यासाठी निघाली होती, पण ती या व्यवसायात नवीन असल्यामुळे फारसा धंदा होत नव्हता, तिच्या नाजूक परिस्थिती बाबत आमच्या पिअर बबिता व कमला ताईकडून माहिती मिळाल्यावर स्नेहालयचे विश्वस्त फिरोजभाई तांबटकर यांनी रेणुकाताईला संजय गांधी विधवा महिला ही सरकारी योजना काढून दिली, त्यातून तिला महिन्याला 800 रुपये पेन्शन नियमित मिळते. जयप्रकाश संचेती सरांना माहिती मिळाल्यावर त्यांनी रेणुकाताईला महिना भर पुरेल एव्हडा किराणा व भाजीपाला स्नेहालय तर्फे पोहच केला होता. प्रतिक्षाच्या कुटूंबाचे सर्व घडाल्याच चक्र अडखळत पण सुरळीतपणे चाललं होतं...  पण अचानक आलेल्या करोणा या महामारी मुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले, सर्व जग थांबले, त्याला लालटाकी काय अपवाद राहणार.
" कही मंदिरोमे दिया नही,
       कही मस्जिदोमे दुवा नही...
             मेरे शहर मे है खुदा बहोत हैं,
                 मगर आदमी का पता नही"...
 रेणुकाताई सारख्या कुटुंब ज्यांचे हातावर पोट असतं, घरात आगोदरच आठराविश्व दारिद्र्य असतं त्यांच्या बद्द्ल काय बोलायचं...आम्ही कार्यकर्त्यांनी वर्क फॉर होम सुरू केलं होतं... प्रतिक्षाला माहिती घेण्यासाठी फोन केला, तेव्हा कुटुंबाची होणारी हेळसांड समजली, आमचे हक्काचे डॉक्टर अंशु व महेश मुळे यांना फोनद्वारे माहिती कळवली, तेव्हा ताबडतोब दोघे दाम्पत्य खाण्याचे डब्बे घेऊन रेणुकाताईच्या घरी पोहचले व पुढील काही दिवसांचीही जेवणाची व्यवस्था लावून दिली. बालभवन संचालिका शबाना शेख यांनी "स्नेहालय सहयोग किट" म्हणजेच कोरडा शिदा पाठवला. त्यामुळे ताईंच्या स्वयंपाक बनवण्याच्या बऱ्याच अडचणी दूर झाल्या, चिमुकल्या मुलींना भरपेट दोन वेळा नियमितपणे खायला मिळायला लागले.... शिक्षण समन्वयक संगीता सानप यांनी या कुटूंबाचे नाव आर्थिक सहयोग यादीसाठी सुचवून मान्य ही करून घेतले, दोन दिवसांपूर्वीच स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर, बालभवनचे संचालक संजय बंदीष्टी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल द्वारे प्रतिक्षाच्या कुटूंबाशी संवाद साधला, व त्यांना 5000/- रुपयेचा आर्थिक सहयोग त्यांच्या खात्यात वर्ग केला, यावेळी रेणुकाताई यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की, 'नवरा गेल्यानंतर आमच्या समाजाने फक्त सांत्वन केले', पण माझ्या स्नेहालय बालभवन परिवाराने नेहमीच, कोणत्याही संकटात मला व माझ्या तीन मुलींना मोलाचा आधार व खंबीर साथ दिली, व यामुळेच मला जगण्या व लढण्यासाठी बारा हत्तीचे बळ मिळते....मी खूप मेहनत करेल व या मुलींना स्वतः च्या पायावर उभे करेल.... तसेच इतर गरजवंत लोकांना पण माझ्या भाकरीचा एक चतकोर हिस्सा का होईना तो देईल....
प्रतिक्षाने हसत, लाजत केवळ एकच 'लाख मोलाच शब्द उच्चारल'... "thank you"....
तिचा हा "thank you" आम्हां कार्यकर्त्यांना ही बारा हत्तीचं बळ देऊन गेलं.....
शेवटी एक ओळ आठवते...
"कुछ सिखाकर ये दौर भी गुजर जायेगा..
फिर एक बार हर इंसान मुस्कुराएगा...
मायूस न होना मेरे दोस्तों इस बुरे वक़्त से,
कल, आज है और आज, कल हो जाएगा"...

रुबिना शेख
समनव्यक
उत्कर्ष बालभवन, लालटाकी..         

मुकुंदनगर की यास्मीन शेख (बालभवन शिक्षिका) के जुबानी हकीकत भरी दास्तान

                                          न्यूज व्हलुज

मुकुंदनगर की यास्मीन शेख (बालभवन शिक्षिका) के जुबानी हकीकत भरी दास्तान

*"कुछ रहम कर ए जिंदगी,  थोड़ा संवर जाने दे....तेरा अगला जख्म भी सह लेंगे,  पर.. पहले वाला तो भर जाने दै"
"मुकुंदनगर" सध्या महाराष्ट्रात हे नाव खूपच गाजत आहे. करोना महामारीचे हॉट स्पॉट घोषित उपनगर. अहमदनगर शहरातील औरंगाबाद रोड वरील एक मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेली एक मोठी दुर्लक्षित, कोणतीही सोयी-सुविधा नसलेली वस्ती.सुमारे उपनगरात 50 ते 60 हजार लोकसंख्या वास्तव्यास आहे, यामधील दर्गादायरा, संजोगनगर, बजाज कॉलनी, या परिसरात हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, भाजीपाला-फळे विकणारे, फिटर अशी हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी कुटूंबाची संख्या अधिक प्रमाणात आहे.अश्याच कुटुंबातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्नेहालयने 2006 साली मलाला बालभवनाची स्थापना केली. येथील एक गरजू कुटुंब म्हणजे आमच्या "निदा" च, निदाचे सध्या वय जेमतेम 12 वर्ष, दिसायला अतिशय गोड, पण ही जन्मत:  मतीमंद,  तिला अचानकपणे केव्हाही फिट येत असते.तिच्या घरात आई 'झारा' अतिशय प्रेमळ, मन मिलावू, आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारी, तिचे हट्ट पुरविणारी, वडील सलिमभाई, जे हाताला काम भेटेल ते करणारे, नाही तर घरीच बसून बायकोच्या जीवावर जगणारे एक व्यसनी अहंकारी अनेक असतात.निदाला एक मोठी बहीन मुस्कान, जी जवळच्या मदरसा मध्ये धार्मिक शिक्षण घेते व एक छोटा भाऊ कैफ तो डॉ. झाकीर हुसेन ऊर्दू शाळेत चौथीला आहे. सोबत दादी हलीमाबी वय 70 च्या आसपास घरात बसून अल्लाह अल्लाह नामाचे स्मरण करणारी व पोरानं कडे लक्ष देणारी, एकन्दरीत सहा लोकांचे कुटुंब, एका 10x12 च्या अतिक्रमण केलेल्या पत्र्याचे शेड ठोकून बजाज कॉलनीमध्ये मागील 25 वर्षांपासून राहत आहे. आई जवळच्या चार पाच बंगल्यामध्ये धुणे-भांडे चे काम करते, व दुपारी वेळ काढून सासू बरोबर घरीच चिंच फोडण्याचे काम देखील करते. यातून जे काही कमाई होईल त्यावर आपला फाटका संसार चालवते. निदा व तिचा भाऊ कैफ हे दोघे आपल्या बालभवनचे मागील चार वर्षांपासूनचे लाभार्थी, निदा न चूकता आपल्या दादी सोबत सर्वात अगोदर अभ्यासाला  येवून बसणारी मुलगी, आता ती एक ते दहा पर्यंत लिहिते, चित्र काढते, थोडं-थोडं तुटक-मुटक गाणंही गाते आणि काही आवडले तर खूपच हस्ते, व काही मनासारखे झाले नाहीतर...... मग निदाला समजावणे कठीणच!
ज्यावेळी करोना महामारीने बाधित रोगी आपल्या अहमदनगर मध्ये तसेच  मुकुंदनगर मध्ये सापडले, त्यावेळी कलेक्टर साहेबांनी सर्व शहर बंद करून टाकले, लोकांना कोणतीही पूर्व सूचना दिली नाही, आणि कोणतीही तयारी न करू देता, सर्व बंद म्हणजे बंदच, त्यातल्या त्यात मुकुंदनगर हॉटस्पॉट क्षेत्र घोषित केले.येथे तर मागील 13 दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू देखील बंद करण्यात आले आहे. ..कारण बजाज कॉलनीच्या अगदी 10 मीटरवर करोनाचे तीन रुग्ण सापडले होते. किसी ने क्या खूब कहा है....
"ए "मौत", जरा पहले आना, गरीब के घर, 'कफ़न' का खर्च, दवाओं में निकल जाता है."
पहिले दोन-तीन दिवस असे काही वाटले नाही... पण घरातील वस्तू, किराणा, भाजीपाला, औषधे व पैसा संपायला लागला. तेव्हा घरा-घरातुन येऊ लागले वेगवेगळे आवाज... तू.. तू.. मै.. मै.., भांडण, हाणामारी, शिव्यागाळ.... भुकेलेल्या मुलांचा रोटी-बोटी साठी मोठमोठ्याने रडण्याचा आवाज ....दादीचे नमाज मध्ये दुवा मागताना पदरात दोन्ही हाताने झाकुन हुंदके देऊन रडण्याचा आवाज, झाराआपा चा घरात काहीच नाही म्हणून नवऱ्या वर संताप व्यक्त करून,
 "मेरी तो किसमत ही फुटी है"
 म्हणून रडण्याचा आवाज, व सलीमभाई चा
" घर के बाहर निकलता हूं तो, पोलीस बहुत मारती है, और जेल में डालती है"
, म्हणून बेबस होऊन ओरडण्याचा आवाज.... हे सर्व आवाज आम्हां कार्यकर्त्यांच्या कानावर रोजच पडायला लागले.
."गजब का वायरस है, पहले ही क्या कम दूरियां थी लोगो के बीच..जो इसने ओर बढ़ा दी"
महामारीच्या बंदच्या तिसऱ्याच दिवशी हनिफ सरांनी आम्हांला 25 गरजवंत लोकांची यादी करायला लावली, आम्ही सर्वात आगोदर निदाच्या कुटूंबाचे नाव टाकले, यादी सरांना पाठवल्या बरोबर पुढील काही वेळात चाईल्ड लाईन टीम 'स्नेहालय सहयोग किट' म्हणजेच जीवनावश्यक शिधा किराणा घेऊन पोहोचले व त्वरित गरजवंत लोकांना मदत पोहच करा असे बजावले.मी तर किट घेऊन निदाच्या घरी धावत पळतच गेले. मला पाहून निदा खूप आनंदी झाली, झारा आपाच्या हातात पुढील 10-12 दिवस पुरेल एव्हढं किराणा त्यांच्याकडे दिला. त्या तर अचंबित होऊन एकटक माझ्याकडे पाहतच राहिल्या पण त्यांचे पाणावलेले डोळे खूप काही बोलून गेले आणि माझे ही.
या प्रसंगातही एक मजेशीर किस्सा आठवला.या शिदा वाटपा सोबत सरांनी आम्हाला बालभवन लाभार्थींच्या कागदपत्रांची डिटेल्स माहिती घेण्याची सूचना देखील दिल्या होत्या, म्हणजे आधारकार्ड, बँकखाते, नाव, मोबाईल क्रमांक असे बरेच काही.आम्ही विचारले हे आपल्याला कश्यासाठी हवे आहेत, सरांचे एकच उत्तर, करू काहीतरी या आपल्याच बालभवन परिवारासाठी बस एव्हढेच.आमचे तर सरांवर 101% विश्वास.आम्ही ज्यावेळी या वस्त्यांमध्ये माहिती गोळा करण्यासाठी जायचो तर, येथील नागरिक असंख्य आडवे तिडवे प्रश्न विचारायचे, त्याचे कारणही तसे होते, काही मुस्लिम कुटुंबियानी शंका उपस्थित केले,तसेच अशिक्षिताना समजावून सांगणे मोठे जिकरीचे होते.बहुतेक मुस्लिम नागरिक या माहितीला CAA/NRC ला जोडून पहायचे, तुम्ही ही माहिती घेऊन भारत सरकारला देणार, तुमची संस्था ही RSS ची आहे,  व ही माहिती घेतल्या नंतर सरकार मुस्लिम लोकांना देशांतून हाकलून लावणार.असे अनेक आरोप आमच्यावर करण्यात आले होते. तरीही आम्ही कार्यकर्ते या गोष्ठीना न घाबरता, न डगमगता, तुमचा जर आमच्यावर विश्वास असेल तरच माहिती द्या .असे धाडसाने बजावले सुमारे 85% टक्के लोकांनी माहिती आम्हांला त्वरित दिली.नंतर काही दिवसांनी आम्हाला समजले की सरांनी या कुटूंबासाठी आर्थिक सहयोग मिळावा म्हणून गिव्ह इंडिया या संस्थेला प्रस्ताव पाठवला होता तो मान्य ही झाला आहे.आपण या कुटूंबाना 5000/- रुपयांची मदत ऑनलाईन देणार आहोत.ही बातमी आम्हाला समजली.नदीचा उगम छोटा असतो पण ती पुढे जाऊन जिवदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते.हे आज कळले, "आपले स्नेहालय किती लांबचा विचार करते या सर्व लोकांचा, म्हणून आम्हांला ही सार्थ अभिमान आहे या परिवाराचा"...तीन दिवसांपूर्वी स्नेहालयचे अध्यक्ष संजयजी गुगळे, सचिव राजीवजी गुजर, सह संचालक हनिफ सर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलद्वारे निदाच्या कुटूंबाशी संवाद साधला व त्यांच्या खात्यात 5000/- रुपये वर्ग केले, त्यावेळी त्यांच्या कुटुंबात जणू 'ईद' चा आनंदाचा माहोल झाला, ज्यावेळेस संजूभाऊ यांनी या कुटूंबाला विचारले,
 "आप इस पैसो का क्या करोंगे",
 झाराच्या दादीने सांगितले,
"हम सबसे पहले निदाकी दवाई खरेदी करेंगे, अगर उसका एक भी डोस छूट जाता है तो, उसे काफी झटके आते है".. झाराआपा म्हणाले,
"मै घर के लिए जीतनी जरूरत है उतना सामान, सबजी खरेदी करूंगी"
. निदाचे वडील सलीम भाई यांनी खूपच प्रामाणिकपणे सांगितले की,
"जैसे आपने हमारी मदत की है, हम भी किसी अनजान जरूरतमंद की मदत इन पैसो में से करेंगे".
 'मला माहीत नाही, हे सगळं काय चाललं हे निदाला समजत असेल, पण तिला बोलता येत नव्हते पण तिच्या हावभावातून, हसण्यातून व आनंद अश्रूतून ते मला जाणवत होतं'... काय माहीत ती एक प्रकारे स्नेहालयच्या कार्यकर्त्यांची कृत्यज्ञता तिच्या पद्धतीने व्यक्त करत असावी.

यास्मिन शेख
शिक्षिका
मलाला बालभवन मुकुंदनगर

यास्मिन शेख या आमचे बालभवन मध्ये शिक्षिका आहेत त्यांचे मनोगत. अस्वस्थ करणारे आणि आपल्या सुरक्षित जगा पासून कोसो दूर.( फोटो वेबसाईट वरून घेतला आहे, मुकुंदनगर चा नाही केवळ याची कल्पना यावी म्हणून टाकला आहे.)

Tuesday, April 21, 2020

पुणे मुंबईतील लॉक डाउन कड़क!उद्धव ठाकरे यांनी घोषित सवलत तात्काळ घेतली मागे



पुणे मुंबईतील लॉक डाउन कड़क!उद्धव ठाकरे यांनी 
घोषित सवलत तात्काळ घेतली मागे

मुंबई :  कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी  लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या  सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल. म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.  ई कॉमर्स कंपन्यांना  इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील. बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे
राज्यभरात  वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे
.

Monday, April 20, 2020

परमिटधारक रिक्षाचालकांना शासनाने आर्थिक मदत मिळावी




                                           न्यूज व्हलुज -

परमिटधारक रिक्षाचालकांना शासनाने आर्थिक मदत मिळावी
अहमदनगर - कोरोना वायरस मुळे लागु करण्यात आलेल्या लॉक डाऊन मधे रिक्षावाले यांच्यावर उपासमारीची वेळ न येऊ देता रिक्षा सुरु करणे अथवा रिक्षा चालकांना मानधन - आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.आम्ही सामाजिक संस्था, समाजहिता साठी अग्रेसर काम करणाऱ्या अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने निवेदना द्वारे मागणी करण्यात आली. सद्या अहमदनगर शहराबरोबरच राज्य व देशपातळीवर सर्वत्र जागतिक कोरोना वायरस मुळे लॉक डाऊन, हॉट स्पॉट लावण्यात आलेले आहे.
            अनेक गोरगरीब जनता, नागरिक यामधे कामगार, मजुर शेतकरी, टॅक्सी ड्रायव्हर, छोटे - छोटे व्यावसायिक, हतावर पोट भरणारे, रोजच्या रोज काम करुन एक वेळ चे जेवन मुश्कीलीने ज्यांना मिळते असे *अहमदनगर शहराची लाईफ लाईन* ज्याला म्हंटले जाते असे रिक्षावाले यां सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
       गरीब, श्रीमंत सर्वांनाच या जीवनावश्यक रिक्षा वाहतुकीची आवश्यकता भासत आहे. आपण लागू केलेल्या लॉक डाऊन मधुन सदर रिक्षा वाहतुकीला शिथीलता देवुन शासनाने परमिट, परवाना दिलेल्या अॅटो रिक्षा चालकांना वाहतुकीची परवानगी देऊन मान.जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांनी जिल्हा पातळीवर भरघोस आर्थिक मदत - मानधन उपलब्ध करून द्यावे जेणे करून या सामान्य गरीब रिक्षा चालकांवर उपासमारीची भयंकर वेळ येणार नाही. व या सामान्य गरीब रिक्षा चालकांचा दुवा मिळाल्याशिवाय राहणार नाही.अशी मागणी अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशन च्यावतीने अध्यक्ष नईम सरदार, सेक्रेटरी इंजि.इम्रान हाजी अन्वर खान पत्रकार, कासम भाई केबलवाला, पै.मोसीम इमाम शेख, दानिश शेख, डॉ.साहिल अहेमद, पै.हमजा चुडीवाला, राजमोहम्मद नुरी, जावेद खान, शादाब शेख, अर्यान नईम आदींनी एका निवेदनाद्वारे मान.जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना केली आहे.


Tuesday, April 14, 2020

मुकुंदनगर भागातील नागरिकांची मुस्कटदाबी



डॉ. बाबासाहेब अम्बेडकर से एक नन्ही सी बच्चीकी दिलकी बात...



डॉ. बाबासाहेब अम्बेडकर से एक नन्ही सी बच्चीकी दिलकी बात...

     "मैं महसूस करता हुँ कि, संविधान साध्य(काम करने के लायक )है.यह लचीला होने के साथ ही इतना मजबूत है के देश की शांति और युद्ध दोनो समय जोडकर रख सके. वास्तवमें मैं कहता अगर कभी कुछ भी गलत हुआ,तो इसका कारण यह नहीं होंगा कि हमारा संविधान खराब था बल्कि इसका उपयोग करनेवाला मनुष्य अधर्मी था."डॉ. बाबासाहेब अम्बेडकरजी आपने  भारतीय संविधान के अध्यक्ष के नाते संसदभवनमें  भारतीय संविधान पेश करते कही थी.
     "भारतका संविधान भले ही जाती के आधार पर भेदभाव करने की अनुमति ना दे,लेकिन आजादीके 67 वर्षोसे अधिक समय गुजरने के बावजूद आज भी जाती के आधार पर लोगोमे भेदभाव हो रहा है."यह बात जब समान अवसर (equal opportunity commission) आयोग अपनी रिपोर्ट में लिखती है. इतना ही नही देश की सर्वोच्च अदालत (suprim court) भी बयान देती है,बढ़ती हुई असहिष्णुता के वजह से अभिव्यक्त स्वातंत्र धोके में है.आज आपकी जयंती के जरिये आप को याद किया जारहा है.
    कोरोना जैसे महामारी की देश मे कोहराम मचा रखा है.जिस वजह से देश २८ दिनों से संचारबंदी लगी हुई है.देश मे कोई भी धार्मिक  हो या सार्वजनिक प्रोग्राम नही मनाया गया.राष्ट्रीय आपदा को समझते हुए सभी भारतीय नागरिकोने सरकार के आदेश को काबुल कर किया.आज सोशल मीडिया को देख रहा था.बहोत सारे जनजाति के लोगोने आपके जयंती के शुभेच्छा के पोस्ट वायरल किये दिखाई दिये.आज की हालात को देखते हुए मैं सामाजिक प्रतिनिधि (जो मुझसे इत्तेफाक रखते है)की हैसियत कुछ दिल से दिल की बात करना चाहती हूँ.
      पिछले भी देश मे करोना महामारी की वजहसे पूरा देश आपत्ति की हालात से गुजर रहा हैं. ऐसे वक्त में भी समान अवसर आयोग की रिपोर्ट के मुताबिक आज भी जाति के आधार पर लोगोमे भेदभाव हो रहा है. यह बहोत अफसोस वाली बात है.जिसकी खास वजह सियासी (पॉलिटिकल) आतंक है.ये दहशत इतनी है कि, स्कूलोमे एक भी प्रोग्राम हो तो नगरसेवक को चीफ गेष्ट आमंत्रित करना पडता है.साहित्य संमेलन के लिए चीफ मिनिस्टर, खेल की स्पर्धा या खिलाड़ी का सन्मान पॉलिटिकल लीडरो के हाथों से करवाया जाता है.धार्मिक प्रोग्राम हो या शादीब्याह हो पॉलिटिकल लीडरो के आशीर्वाद बिना हो ही नही पाता.आप जैसे महान  नेता की जयंती और पुण्यतिथिभी इन लीडरो के बिना मनाई नही जाते.यहाँ तक के आपको भी जाती जाती में बाट दिया पॉलिटिक्स केलिए यानी राजकीय स्वार्थ के लिए.
    २०१९ चुनाव से पहले प्रधानमंत्री को अपने भाजपा के नेताओं को सूचना दी जाती है कि दलित समाजसे संपर्क बढ़ाओ.और काँग्रेस जैसी धर्मनिरपेक्ष पार्टियाँ को सॉफ्ट हिंदुत्व का सहारा लेना पड़ता है.दिल्ली चुनाव में हनुमानजी के नामपर सियासत कराई गई.राम के नाम पर भी सियासत जारी है.भाजपा की महिला नेता का २०१९ के पहले दलित संपर्क के प्रधानमंत्री के सूचना पर बयान था,"दलितोके घर भोजन करने मैं  प्रभु रामचंद्र नही हूँ" बाबासाहेब ये देखकर बडा अफसोस होता है.धार्मिकता अक्सर महिलाओमे होती है.लेकिन यह असरात महिलाओंमें भी सार्वजनिक रूप से दिखाई देने लगे है. मराठा महिलाने रसोई पकाने खिलाफ ब्राह्मण महिला होलेबाई ने धार्मिक कारण देते हुए केस दर्ज करवाई थी.क्योके महिला ब्राह्मण नही थी. अजब तो ये था के पुरोगामी कहनेवाले और बातबात पर भारतीय संस्कृति की बात करनेवालो के लब खामोश थे.
      सर्वोच्च न्यायालय के बयान के मुताबिक यह असहिष्णुता ही है.बाबासाहेब आपको ये सब सुनकर तकलीफ हो रही होगी.देश कोरोना महामारिसे परेशान है, राजस्तान ने एक बच्चा माँ बाप की जाती मुसलमान होने की वजह से डॉक्टर डिलीवरी करने से इनकार कर देता है और बच्चा मार जाता है.हमारे शहर अहमदनगर में डॉक्टर ने मुस्लिम महिला की डिलीवरी करनेमे साफतौर पर असमर्थता दिखलाई.यहाँ तक के हेल्पलाइन पर नियुक्त कर्मचारीने मुस्लिम बहुल इलाके को गोलिसे मार देनेकी बात पालिका कर्मचारी कह डाली. कई फेरीवालों को मारपीट की जा रही है.मोबलिंची में बहोतसे मुसलमान अपनी जान गवा बैठे.जरा जारी बात में गद्दारो का लकब लगाया जाता है.हक की बातोंपर बदनाम किया जाता है.देश की गुप्तहेर एजेंसी कहती है.तबलीग जमात अमन का काम करनेवाली जमात है.उसके नाम से वबाल मीडिया ही नही नेता भी मचा रहे है.देश की फिजा को मुसीबतों में खराब कर रहे है. डॉ. बाबासाहेब आप ने जो बात कही के संविधान का उपयोग करनेवाले मनुष्य(सरकारे)अधर्मी है.
    डॉ. बाबासाहेब आज मैने अपनी हाल का रोना नही है रोना.घर नही, कपड़े नही, खाने को नही.यह तो मिल जायेंगे, जब सियासतदान(राजकारणी)जात पात की जहर फैलाना छोड़ देंगे. इसलिए ये बात भी मैंने आपसे की,
 चलो कुछ तो असर करेंगी यह नेक ख्वाहिश आपके जयंती का अवसर पर की है.इसी उम्मीद के साथ जातपात का जहर कम होंगा.
      आज हम भारतीयों का सर शर्मसार है.देशके कोरोना महामारी का मरीज तो अच्छे हो रहे है,अब आप ही बताओ, जातिपातीके बीमारी का क्या इलाज है?
 पूछता है भारत एक बच्ची के जुबानी !

अफजल सय्यद, न्यूज व्हलुज, अहमदनगर, महाराष्ट्र.

Sunday, April 12, 2020

मुकुंदनगर उपनगरात नागरी सुविधा पुरविनारी यंत्रनेत नियोजनाचा अभावमुळे नागरिक त्रस्त



                           मनपा चा भाजीपाला

मुकुंदनगर उपनगरात नागरी सुविधा पुरविनारी यंत्रनेत नियोजनाचा अभावमुळे नागरिक त्रस्त

अहमदनगर - अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मुकुंदनगर उपनागरातील नागरिकांची हॉटस्पॉट लागू करण्यात आल्याने,आपणा कडून  उपलब्ध करण्यात आलेली व्यवस्था ही व्यावस्थापनाच्या नियोजन अभावापायी कूचकामी ठरली आहे. दि.१० एप्रिल २०२० ते १४ एप्रिल २०२० पर्यंत हॉटस्पॉट जाहिर केल्या नंतर आपणा कडूनच अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्याचे जाहिर करण्यात आले. सेवेसाठी काही फोन आणि मोबाइल नंबर जाहिर करण्यात आले.
           हॉटस्पॉट ची सक्ति मुकुंदनगरच्या नागरिकांनी देशहितासाठी स्वीकारली आणि सगळ्यांनी घराबाहेर न पडण्याचे काटेकोर पणे पालन आज पर्यंत केले आहे. असे असताना १० एप्रिल पासून मुकुंदनगर मधील नागरिक गरजेची वस्तु साठी फोन करत असताना व्यस्त आणि सेवेकरी कर्मचारी यांचे मोबाईल बंद असतात.या बाबत मुकुंदनगरच्या नागरिकांची आहे.आज दि.१२ एप्रिल २०२० रोजी दूध आणले परंतु भाजीपाला साठी तीन कांदे, तीन बटाटे, थोड़ीसी गवार आणि मिरची, काही विचित्र पाकिट बनवले.आणि त्यातही पोलिसी अत्याचार ,घालुन पाडुन बोलने आणि हाकलूंन लावणे.महिन्याचा बाजार खरेदी करायचा का?महिलांशी अश्या उद्धट बोलत असल्याने बऱ्याच महिला काही खरेदी न करता परतल्या आहेत.किराना  बाबत कोणताच निर्णय घेतला गेला नाही असे संबंधित जबाबदारांचे म्हणणे आहे.दोन दिवसानंतर दूध आणि पाच दिवसानंतर भाजीपाला असे नियोजन असेल तर असे जाणून बुजुन अल्पसंख्यक बहुल मुकुंदनगरच्या बाबतीत होत आहे अशी शंका निर्माण होत आहे.त्यास कारणही ठोस आहे.हेल्पलाइन फोन वरील मनपा कर्मचारी याने केलेले वादग्रस्त वक्तव्य.अशा मानसिकतामुळे अत्यावश्यक सेवा ही मकुंदनगर वासियांसाठी अत्यावस्थ ठरत आहे.
      लहानबाळा साठी दूध,दाळ भात,वृद्धाचे मधुमेह, रक्तादाब सारख्या अनेक व्याधि नुसार लागणारे वेळेवर लागनारे जेवन जर अश्या आपल्या हलगर्जीपूर्ण सेवेमुळे मिळणार नसेल तर आपण गाम्भीर्यणे विचार करुण परिसरातील दुकानांना वेळचे बंधन देवून,पूर्ववत चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी द्यावे.मुकुंदनगरचे नागरिक सोशल डिस्टनिंग चे आणि संचार बंदीचे पालन करतील.
          मनापाचे कर्मचारी चे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी आणि  निलंबनाची कारवाई करण्यात यावी.ज्या मुळे अश्या विकृतिस आळा बसेल. सम्बंधित रेकॉर्डिंग ही आपणास पाठवत आहे.
आपण आमच्या तकरारीची दखल घ्याल.मनपा अकार्यक्षम ठरल्याने हॉटस्पॉट शिथिल करण्यात यावे ही विनंती मुकुंदनगर चे नागरिकांचे वतीने करण्यात येत आहे.
                         हेल्पलाइन चा बोजवारा


 

,