Tuesday, May 5, 2020

लाँकडाऊन_वास्तविकता_आणि_जगण्याचा_संघर्ष





लाँकडाऊन_वास्तविकता_आणि_जगण्याचा संघर्ष


       नमस्कार मित्रांनो,तारीख पे तारीख लाँकडाऊनची वाढत चालली आहे. टीव्ही पाहुन काही दिवसानी लोकं  हर्ट अँटँकने मरतील इतक्या त्या घाबरवणा-या बातम्या.कोरोना महामारीचं जागतिक संकट ओढवलंय, मान्य परंतु आज हातावर पोट भरणारा वर्ग, छोटी -मोठी कामे करुन उपजीविका भागवणारा वर्ग, शेतमजुर, अगदी भंगार गोळा करुन प्रपंच चालवणा-या लोकांच्या घरात आज काय परिस्थिति असेल? विचार करुनच अंगाचा थरकाप उडतो. कुठलीही प्रिंट मिडीया, न्युज चँनेल्स, दिग्गज लोकांच्या माध्यमातुन तुमच्यासमोर हे चित्र येणार नाही /आणले जाणार नाही परंतु या लेखाच्या माध्यमातुन तुमच्या -माझ्या समस्यांना/अडचणींना वाचा फोडण्याचा प्रयत्न आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या नावाखाली होणा-या गर्दीने कोरोनाचा संसर्ग होत नाही काय? दारुवाल्यानी -मावा विकणारे काय उच्छाद मांडलाय सर्वांना माहित आहे ते सांगणार नाही. खरेतर लाँकडाऊन फक्त गोर-गरीबांचे रोजगार हिसकावुन पाळायचा असतो यावर आता शिक्कामोर्तबच झाले आहे. टनाने शेतक-याचा टरबुज /खरबुज, भाजीपाला असा माल विक्रीअभावी वाया गेला पण #अर्थव्यवस्थेचा_कणा म्हणुन दारु विकणाराला परवानगी द्यायची अन् शेतकरी उभा जाळायचा ही आमची धोरणं आहेत....
     #कष्टकरी_वर्ग_माझा_अन्नदाता_आहे_आपसुकच_त्यांच्याविषयी_जास्त_आस्था_आहे...

#अब_अपना_क्या_होगा_मुन्नाभाई_?
     प्रत्येकाचाच हा प्रश्न खुप अस्वस्थ करतो... भावांनो मीच सध्या खुप हँग झालोय.
   या महामारीमुळे आपण सर्वजण घरात बसुन आहोत. सध्या कुणाच्याच हाताला रोजगार नसल्याने आपल्यासारखे दहातले नऊजण हवालदिल आहेत, आला दिवस त्यांची चिंता वाढवणारा ठरत आहे.पाच-सहा वर्षांपुर्वी मी औरंगाबाद एमआयडीसी परिसरात काम करत होतो. तेव्हा औरंगाबादची बरीच कामगार मंडळी सोबत होती. माझी परिस्थिति तिकडे सर्वांना माहित असल्याने त्यांच्या डब्यात ते मला जेऊ घालायचे. त्यामुळे तिथल्या प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असाच काही महिन्यांपुर्वी त्यातल्या एका मित्राने अडचणीत आहे, बचतगटाचा हफ्ता थकलाय तीन हजाराची मदत करु शकतो का म्हणुन विणवणी केली. त्याला बोललो सध्या मीच रिव्हर्स आलोय भावा, दोन हजार तुला पोहोच करतो. त्यानंतर काही महिन्यांनी लाँकडाऊन लागला. प्रत्येकाची ठराविक दिवसांनी फोन करुन हालहवाल विचारण्याची सवय मला आहे, असाच गेल्या आठवड्यात त्याला फोन केला, त्याला वाटलं मुन्नाभाई पैशासाठी फोन करतोय ,दबक्या सुरात बोलला "यार मुन्नाभाई बहोत परेशानी चलरी यार, महिनेसे घर में बैठा हु कुछ भी काम नही है, फिलहाल तो तेरे पैसे नै दे पाऊंगा... " वयाच्या विशीतच बापाचे छत्र हरपले, पश्चात दोन छोटे भाऊ, आई, औरंगाबाद मध्ये भाड्याचे घर, त्याला चार आकडी भाडे, भावांचे शिक्षण अशा परिस्थितिमध्ये स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडुन तो माझ्याबरोबर कंपनीत कामाला यायचा. माझीही परिस्थिति तीच असल्याने आम्ही समदुःखी होतो. आज तो घरात बसुन आहे, कमवणारा एकटा आहे, घरभाडे मालकाने माफ केले तर बरे नाहीतर खुपच वाईट वेळ येईल ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले, मी चिंताग्रस्त झालो.
          दुसरा एक मित्र गेवराईचा काही दिवस माझ्यासोबत रिक्षा चालवायचा,आता खाजगी बसवर चालक म्हणुन काम करतो. मला फोन करुन बोलला " मुन्नाभाई टेन्शन मत लो यार तुम यहा पे गेवराई आ जाओ, कुछ जुगाड करता तुम्हारे लिये... "मी त्याला नम्रपणे नकार दिला.  अशी समजुन घेणारी माणसं आहेत जीवनात म्हणुन काही वाटत नाही .घरी मी बसलेलो असताना माझा भाऊ सतत चिंतेत असतो त्याच्या चेह-यावरचे भाव मला समजतात पण मी त्याला बोलुन दाखवत नाही तो मला बोलत नाही.

#लाँकडाऊन_रमजान_आणि_मुसलमान...
       कधी नव्हे ते यावर्षी भर उन्हाळ्यात रमजानचा महिना आला आहे. त्यात कोरोनाची महामारी. अाज माझा पंचरवाला, चहावाला, रिक्षावाला, भाजीवाला, हमाली करणारा, मजुरी करणारा, मिळेल ते काम करणारा, कष्ट हेच भांडवल समजणारा प्रत्येक बांधव आज घरात बसुन आहे .मुस्लिम समाजात हातावर कमुन खाणारे 80% लोक आहेत. शेतीवाडीचा विषयच नाही.कुठल्याही कामाला आम्ही लाजत नाही, मेहनत करुन आपला चरितार्थ प्रत्येकजण भागवत असतो.
       आज कोरोनाच्या महामारीमुळे बेकारीची कु-हाड सर्वांवर कोसळली आहे, प्रत्येकजण हवालदिल झालाय. या पवित्र रमजान महिन्यात वर्षातला सर्वात मोठा सण रमजान ईद साजरी केली जाते.महिनाभर प्रत्येक घरात आनंदाचे धार्मिक वातावरण असते. या महिन्यात इतर महिन्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट खर्च असतो... शिरखुर्मा-गुलगुले बसवण्यासाठी लागणारा किराणा ,लहानग्यांपासुन आबालवृध्दांपर्यंत प्रत्येकाला नवीन कपडे, चपला आणि बरंच काही..... परंतु यावर्षी परिस्थिति खुपच बिकट आहे कर्ते-धर्ते घरात बसुन आहे, कोरोनाचे सावट या आनंदाच्या क्षणांवर आहे.
      समाजातील सुशिक्षित वर्गाकडुन आपला जकातचा पैसा गरजुंना द्या जेणेकरुन त्यांनाही सण साजरा करता येईल अशी मोहीम राबवली जातेय प्रत्यक्षात त्याची अंमलबजावहणी ही होईल. कुणीच या आनंदाच्या क्षणांपासुन वंचित राहायला नको हीच अल्लाहकडे प्रार्थना आहे....
      लिहीण्यासारखं खुप आहे पण पुन्हा कधीतरी......
एस मुन्ना , बोधेगाव ,शेवगाव

No comments:

Post a Comment