Wednesday, May 6, 2020

"आणि माणसांचा जथ्था निघाला... पायी, अनवाणी, रक्ताळलेली, वेदनांचा डोह उन्हाखाली जिरवून..!"




#प्रगतीपथावरील_युवा #लेख_क्रमांक_१२

     "आणि माणसांचा जथ्था निघाला... पायी, अनवाणी, रक्ताळलेली, वेदनांचा डोह उन्हाखाली जिरवून..!"


पाणी, मेडिकल, झंडु  बाम, जेवण, बिस्कीट, फळ आणि रात्री भेटलेच तर झोपण्यासाठी अभय द्या...

माणसंच आहेत ती...!
      लोकांना हे आवाहन करीत स्वतःसुध्दा या लाँकडाऊनच्या कालावधीत घराकडे जाण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने जीवाच्या आकांताने पायी जाणा-या शेकडो लोकांना आतापर्यंंत  स्वखर्चानेे जेवणाची -राहण्याची व्यवस्था करणा-या,भटक्या-निराधार बांधवांना नवजीवनाची संजीवनी देणा-या, समाजकार्यासाठी स्वतःला वाहुन दिलेल्या,आभाळ उसवलेल्यांचा ख-या अर्थाने #आधार ठरलेले #आधार_सेवा_संकल्प_फाऊंडेशनचे_सर्वेसर्वा_जयवंत_मोटे यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेणारा हा लेख.

#कोण_आहे_जयवंत_मोटे...
       आपल्यासारखाच सर्वसामान्य कुटुंबातला शेतक-याचा पोरगा, गाव वडाळा बहिरोबा ता. नेवासा. पुस्तकाची शाळा कमी शिकला पण स्वार्थी समाजात राहुन अनुभवाच्या शाळात पीएचडी केलेला. शेतीला जोडधंदा म्हणुन वडाळ्यात छोटेखानी हाँटेल अन् वाँशिंग सेंटर चालवुन उदरनिर्वाह करणारा पैलवान गडी. कुस्त्याची भारी हौस गड्याला पण ऐन उमेदीच्या काळात डोक्यावरील वडीलरुपी छत्र हरपल्याने आपल्या इच्छा -आकांक्षाचा त्याग करुन प्रपंचाचा गाडा हाकणारा.बालपण खुपच हलाखीच्या परिस्थिति मध्ये गेल्याने गरीबीची जाण ठेवणारा.ज्या यातना आपण भोगल्या त्या इतर कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणुन अहोरात्र राबणारा.
      लाँकडाऊनमुळे हातावर पोट असणारे स्थलांतरीत मजुर वाहनांअभावी तळपत्या उन्हात अंगाची काहिली होत असताना आपल्या चिल्या-पिल्यांसह अन्न-पाण्याविना जीवाच्या आकांताने  चालत असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे .अशा कुटुंबियांची आस्थेने विचारपुस करुन त्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करुन त्यांना रात्री अपरात्री राहण्यासाठी निवारा ते देत आहेत. दीड महिन्यांपासुन हे काम अविरत सुरु आहे.गेल्या  आठवड्यात  #यवतमाळकडे पायी जात असलेल्या महिलेला वडाळ्यात प्रसुतिवेदना सुरु झाल्या. त्यांची परिस्थिति जयवंत भाऊने ओळखली,अनोळखी गाव अनोळखी माणसं अशा परिस्थितिमध्ये त्या महिलेचा पती रडवेल्या चेह-याने मदतीची याचना करत होता.  गावातीलच आशा स्वयंसेविकांच्या मदतीने त्या कुटुंबियांना #आधार देत सुखरुपपणे बाळंतपण त्या महिलेचे झाले. जात, धर्म, पंथ नाही तर फक्त माणुसकीचा धर्म निभावणारा आमचा #जयवंत_भाऊ.

"#दुसरों_कि_सेवा_करने_मे_अगर_आनंद_मिले_तो_वह_सेवा_है_वरना_बाकी_सब_दिखावा_है..

#बेघर_निराधारांच्या_सेवेसाठी_स्वतःला_वाहुन_घेणारा_अवलिया...
काही महिन्यांपुर्वी एका मनोरुग्ण गरोदर महिलेची सेवासुश्रुषा करुन आठ दहा दिवस तिचा सांभाळ करुन ,सोशल मीडियाच्या माध्यमातुन तिच्या घरच्यांचा शोध लावत तिला घरपोच केले. असे बरेच मनोरुग्ण आहेत जे आपल्या आसपास फिरत असतात, त्यांचे कुणाला काही घेणे देणे नसते. ते कुठे खात असतील वगैरे विचार तर लांबच.... असाच एक मनोरुग्ण असलेले त्यांना आढळला अपघात झाल्याने पाय फ्रँक्चर होता पाच -सहा दिवसांपासुन एकाच जागेवर बसुन... पाहताक्षणी किळस यावी असा अवतार मळके कपडे, वाढलेले केस -दाढी त्यात एकाच जागेवर बसुन असल्याने मल -मुत्र त्याच जागी अक्षरशः ओकारी यावी अशी परिस्थिति अशा मनोरुग्णाची किळस न करता त्यांनी त्याला अंघोळ घातली, न्हावी कटींग करायला धजावेना म्हणुन स्वतः त्याचे केस कापले,जखमेवर मलमपट्टी करुन त्याला बरे केले. आधिक माहिती काढली असता तो मनोरुग्ण व्यक्ती माजीसैनिक होता. त्यालाही घरी पोहोच केले.
       अशा अनेक बेघर मनोरुग्णांची सेवा-सुश्रुषा करुन ते काहीच तपास नाही लागला तर मोठ्या स्वयंसेवी संस्था, निराधारांसाठी जिथं राहण्याची -जेवणाची व्यवस्था आहे अशा संस्थांच्या ताब्यात ते या निराधार लोकांना देत आहेत.

#वडिलांच्या_पावन_स्मृतींना_अभिवादन_म्हणुन_हे_काम...
      जयवंत भाऊचे वडील आध्यात्मिक वृत्तीचे होते. दरवर्षी पंढरीची वारी ठरलेली, भजन -किर्तनात तल्लीन असलेल वारकरी संप्रदायाचा पाईक असलेलं व्यक्तिमत्व.हे बारा बर्षांचे असताना असेच त्यांचे वडील चारधाम यात्रेसाठी गेले होते. त्यांना पर्यटनाची आवड असल्याने ते सहसा लवकर घरी येत नसत,त्या वर्षी वडील घरी न येता त्यांच्या निधनाची बातमी घरी येऊन धडकली .मनमाड रेल्वे स्टेशनवर त्यांचा मृतदेह सापडला होता या भावंडावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, आधारछत्र हरपले होते.
       अँन्बुलन्स दारात आली आवंढा गिळत माहिती घेण्याचा प्रयत्न कुटुंबियांनी केला असता त्या थंडीच्या दिवसात वडीलांच्या अंगावर फक्त कपडे होते. त्यांना दम्याचा त्रास होता. अंगावर उबदार पांघरुन नसल्याने ती थंडी सहन न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने ते मरण पावले होते. इतक्या लोकांच्या गर्दीत कुणाला वडीलांची दया आली नाही किती ते निर्दयी लोक, वेळीच त्यांची परिस्थिति बघुन आजुबाजुला असणारांनी त्यांना दवाखाव्यात हलवले असते तर आज ते जीवंत असते पण माणुसकी सर्वांकडेच नसते ओ....
        वडिलांच्या निधनानंतर खुप अडी-अडचणींचा सामना करावा लागला, नाती -गोती, भावकी सारे काही कळले. काही वर्षांनी स्वतःची परिस्थिति जरा बरी झाल्यानंतर वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा बेघर -निराधार लोकांची सेवा करण्याचे व्रत त्यांनी घेतलेे आहे आणि ते निभावत आहेत.

#स्वतःसाठी_सारेच_जगतात_थोडे_समाजासाठी_जगा...
#छत्रपतींचा_सेवक_जयवंत_मोटे

       शिव-शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीला अनुसरुण वाटचाल करणा-या जयवंत भाऊंना हे काम करत असताना खुप अडचणी येतात. स्वतः काही करायचे नाही पण लोकांचे पाय ओढायचे अशा समाजविघातक प्रवृत्ती ही समोर येत असतात परंतु कोणत्याही परिस्थिति मध्ये हे काम थांबवायचे नाही हे त्यांनी मनाशी ठरवले आहे. शिवजयंतीला डिजे लावुन त्यापुढे नाचायचे नसते तर त्या रयतेच्या कल्याणासाठी लढलेल्या शिवबाची शिकवण अंगीकारायची. शिवबांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणुन #छत्रपतींचा_सेवक म्हणुन काम करायचे हे त्यांनी ठरवलंय.....

#लोग_जुडते_गये_कारवाँ_बनता_गया...
     हे काम करत असताना समाजभान जपणा-या मित्रांचे सहकार्य लाभते. चकलांब्याचे माझे मित्र #कैलास_शिंदे दादा तुमच्यामुळे माणुसकी जपणा-या या अवलियाशी ओळख झाली तुमचे मनस्वी आभार
      #जयवंत_भाऊ तुमच्या कार्याला माझा सलाम, आता शुभेच्छा नाही तर सोबत मिळुन काम करु.....

#एस_मुन्ना_७०५७०५५५८५ 🙏

No comments:

Post a Comment